सरकाँग रिंपोछे यांचा तांत्रिक उपासकांना सल्ला

“अर्ध-वेळ” तांत्रिक साधना करणं

दीर्घ काळासाठी पूर्ण-वेळ तांत्रिक साधनेकरिता एकांतवासात जाणं लाभदायक असलं, तरी हा पर्याय स्वीकारण्याची चैन बहुतांश लोकांना परवडत नाही. त्यामुळे आपल्याकडे तीन महिने किंवा अधिक मोकळा वेळ असेल तरच अशा प्रकारची एकांतवासातील साधना आपल्याला करता येईल, हा विचार संकुचित आहे, असं रिंपोछेंना वाटत असे. एकांतवास म्हणजे स्वतःला इतरांपासून तोडून टाकण्याचा कालावधी नसतो, तर आपली मनं उपासनेने लवचिक करण्यासाठी तीव्र उपासना करण्याचा हा कालावधी असतो. सकाळी व रात्री प्रत्येकी एक सत्र पूर्ण करून उर्वरित दिवसभर सर्वसामान्य आयुष्य जगलं, तरी ते अगदीच स्वीकारार्ह आहे. स्वतः रिंपोछे यांनी त्यांच्या अनेक साधना अशा प्रकारे केल्या, ते साधना करत असल्याचं कोणाला कळूही नये अशा रितीने त्यांनी हे केलं होतं. 

एकाच पलंगावर झोपणं आणि एकांतवासाच्या कालावधीमध्ये त्याच जागी साधना करणं, ही या उपासनापद्धतीमधील एकमेवर मर्यादा आहे. अन्यथा, आध्यात्मिक ऊर्जा विकसित करण्यामधील ऊर्जा विस्कळीत होते. शिवाय, प्रत्येक सत्रामध्ये किमान काही मंत्र, दंडवत, किंवा इतर काही पुनरावृत्तीच्या उपासना असाव्यात, एकांतवासाच्या पहिल्या सत्रामध्ये या पुनरावृत्तीची विशिष्ट संख्या निश्चित केलेली असावी. त्यामुळे रिंपोछे यांनी प्रारंभिक सत्रामध्ये विशिष्ट निर्धारित उपासनेची केवळ तीन वेळा पुनरावृत्ती करण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे अगदी गंभीर आजारातही एकांतवासातील उपासनेचं सातत्य भंग पावणार नाही आणि पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करावी लागणार नाही.

Top