चार आर्य सत्यांनुसार रचना केलेले लाम-रिम

चार सत्य स्थिती

बुद्ध शाक्यमुनींनी त्यांना साक्षात्कार झाल्याचे दाखवून दिल्यावर तीच स्थिती आपल्याला साध्य करण्यासाठी विविध पद्धती शिकवल्या. प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणणं, निराळ्या शब्दांत सांगायचं तर, धर्माचं आचरण करणं, ही याची पायाभूत पद्धती आहे. (१) प्रत्येकाला सामोरं जावं लागतं अशा खऱ्या समस्या/ दुःख. या समस्यांची (२) खरी कारणं असतात / दुःखाची कारणं. तरीही, (३) कारणांचं उच्चाटन करून या समस्यांचं खरोखरचं निवारण शक्य असतं / दुःखाचं निवारण, आणि या समस्यांचं निवारण करण्यासाठी आपण सत्य मार्ग अनुसरावेत / दुःख निवारणाचे अष्टांगिक मार्ग. 

Top