बौद्ध शिकवणींच्या परीक्षणासाठीची चार स्वयंसिद्ध तत्त्वे

बौद्ध शिकवण योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तिचे काळजीपूर्वक परीक्षण आवश्यक आहे. जर आपल्याला चांगले गुण विकसित करायचे असतील, तर आपल्याला आधीपासून हे माहीत हवे की त्यासाठी काय करणे गरजेचे आहे, एकदा आपण ते विकसित केले की त्याचा उपयोग कसा करायचा, ते लाभ तर्कसंगत आहेत की नाही आणि ते लाभ मूळ प्रकृती अनुरूप आहेत. जर ती शिकवण या सर्व निकषावर खरी उतरत असेल, तर आपण आश्वस्त होऊ शकू की ती अंगीकारायला हरकत नाही.

धम्म साधनेचे  यश व्यावहारिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. याचा अर्थ धर्माच्या शिकवणींचे अशा रीतीने परीक्षण करणे आवश्यक असते की जे गोष्टींच्या अस्तित्वाला अनुरूप असेल. अशा परीक्षणासाठी बुद्धांनी चार स्वयंसिद्ध तत्त्वे (रिग्स-पा-बझी) सांगितली आहेत, ज्या बौद्ध दर्शनातील मूलभूत धारणा आहेत. स्मरणात असू द्या, बुद्धाने सांगितले आहे, ‘माझी शिकवण केवळ माझ्यावरील श्रद्धेमुळे किंवा आदरामुळे स्वीकारू नका, तर सोने खरेदी करताना जशी पारख केली जाते, तशी त्याची स्वतः पारख करा.’

चार स्वयंसिद्ध तत्त्वे खालीलप्रमाणे आहेतः 

  • अवलंबन
  • व्यावहारिकता
  • तर्कावर आधारित सिद्धता
  • गोष्टींचे स्वरूप अर्थात नैसर्गिक प्रकृती 

आता त्सोंगखापा बृहत ग्रंथ मार्गावरील  क्रमिक स्तरासम्बंधी च्या भव्य व्याख्यानात  या चार तत्त्वांना कशा रीतीने स्पष्ट करतात ते पाहू. 

Top