चौथं आर्य सत्य: सत्य मार्ग

खऱ्या दुःखाची खरी कारणं खऱ्या अर्थाने संपुष्टात आणण्यासाठीची खरा मार्ग म्हणजे शून्यत्वाचा असांकल्पनिक बोध. शून्यत्व (निर्वातता) म्हणजे आपण स्वतःच्या, इतरांच्या व सर्व घटितांच्या अस्तित्वाविषयी जे सत्य असल्याची चुकीची कल्पना करून घेतो त्या संदर्भातील सर्व गोष्टींचा संपूर्ण अभाव होय. शून्यत्वाचा असांकल्पनिक बोध हा मनाचा सत्य मार्ग आहे, कारण दुःखाची कारणं खऱ्या अर्थाने थांबवण्यासाठीचा मार्ग म्हणून कार्यरत असतो.

पहिली तीन आर्य सत्यं

आपण दुःखाचे व असमाधानी सुखाचे चढ-उतार टिकवून ठेवतो, तसंच या चढ-उतारांचा अनुभव ज्या मर्यादित शरीराद्वारे व मनाद्वारे घेतलेला असतो ते शरीर व मनही वारंवार मिळवत राहतो, हे आपल्या समोरचं खरं दुःख आहे, अशी शिकवण बुद्धाने दिली. आपण आणि या भावना कशा अस्तित्वात असतात याबद्दलचा आपला अजाणपणा, हे यामागील खरं कारण आहे. या भावना अशक्य मार्गांनी अस्तित्वात असल्याचं आपण मानतो- उदाहरणार्थ, त्यांना स्वयंपूर्ण ठोस अस्तित्व असल्याचं आपल्याला वाटतं- आणि आपल्याला ते ज्या फसव्या पद्धतीने सामोरे येतात तशाच पद्धतीने ते प्रत्यक्षात अस्तित्वात असतात असं आपण मानतो. या गैरसमजुतीमुळे अस्वस्थकारक भावना निर्माण होतात, आणि त्यातून पुन्हा आपण ‘स्वतः’ची जी कल्पना केलेली असते तिचं प्रतिपादन करणं वा तिचा बचाव करणं यासाठीच्या कर्मजन्य प्रेरणा वाढीला लागतात, पण वास्तविक हे निव्वल भ्रम सतात. आपल्या मृत्यूच्या वेळी या गैरसमजुतींमुळे मर्यादित शरीर व मर्यादित मन यांद्वारे सांसारिक जीवन सुरू  राहतं.

परंतु, खरी कारणं, आणि खरं दुःख पुन्हा कधीच उद्भवणार नाही अशा रितीने संपुष्टात आणणं शक्य आहे, असा साक्षात्कार बुद्धाला झाला आणि त्याने त्याची शिकवण दिली. असा खऱ्या अर्थाने दुःखाची कारणं थांबवणारा निरोध म्हणजे चौथं आर्य सत्य.

Top